Breaking

सोमवार, जून ०६, २०२२

सलमान खानच्या हत्येचा लॉरेन्सने रचला होता कट !


 

हिंदी चित्रपट सृष्टीतील दबंग अभिनेता सलमान खान यांना धमकी येण्याच्या काही घटना घडलेल्या असून यापूर्वी  तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिष्णोई याने सलमान खानच्या हत्येचा कट देखील रचला होता. 


अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देणारे एक पत्र नुकतेच मिळाले असून मुंबई पोलीस याचा तपास करीत आहेत. 'लवकरच तुमची अवस्था  सिद्धू मुसलावाला सारखी होईल' असा धमकीचा मजकूर असलेले हे पत्र सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्यासाठी होते. सलीम खान फिरायला गेल्यानंतर ते ज्या ठिकाणी बसायला जातात त्या ठिकाणी त्यांच्या बॉडीगार्डला हे पत्र सापडले होते. अज्ञात व्यक्तीचे हे पत्र  असले तरी यामागे लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे म्हटले जात आहे . वांद्रे पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे आणि तपास देखील करीत आहेत. 


लॉरेन्स बिश्नोई हा सद्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात असला तरी  ७०० जणांची त्याची टोळी आहे. लॉरेन्स आणि गोल्डी हे एकत्र काम करतात. सलमान खान याला आत्ता आलेली धमकी ही पहिली धमकी नाही तर लॉरेन्स याने या आधी सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होतीच पण त्याने हत्येचा कट देखील रचला होता परंतु तो यशस्वी झाला नाही. सुरक्षा यंत्रणांनी जेंव्हा चौकशी केली तेंव्हा लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खान याच्या हत्येचा कट रचला होता अशी कबुली देखील दिली होती.


सलमान खानची हत्या करण्याची जबाबदारी राजस्थानमधील गँगस्टर संपत नेहरा याच्यावर सोपवली होती, संपत नेहरा यासाठी मुंबईला गेला आणि सलमानच्या घराची रेकी देखील केली होती, संपत नेहरा यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती देखील लॉरेन्स याने चौकशीत दिली होती. दूर अंतर असल्यामुळे संपत याला सलमान खानपर्यंत पोहोचता आले नव्हते. नंतर संपत नेहरा याला पोलिसांनी अटक केली होती. 


म्हणून हत्या करायची होती !

कळवीट शिकारीच्या प्रकरणामुळे सलमान खान याला जीवे ठार मारण्याची धमकी लॉरेन्सने दिली होती. लॉरेन्स हा बिष्णोई समाजातील असून काळवीट शिकार प्रकरणी तो संतप्त झालेला होता. त्यांनतर त्याच्या टोळीने सलमान खान याला मारून टाकण्याची योजना आखली होती. या योजनेत त्याला यश मिळाले नव्हते.       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा